देश
संपामुळे चार हजार कोटींचा फटका
वाहतूकदारांच्या बंदमुळे महाराष्ट्रात ६४० कोटी रुपयांचे नुकसान
डिझेलचा समावेश जीएसटी अंतर्गत करुन त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कर घटवावेत यासह अन्य काही मागण्यासांठी शुक्रवारपासून वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. संपामुळे देशभरात वाहतूक उद्योग क्षेत्राचे तब्बल चार हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात हाच आकडा ६४० कोटी रुपये आहे. पहिल्या दिवशी संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस या वाहतूकदार संघटनांकडून करण्यात आला आहे. या संपातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.
डिझेलचा समावेश जीएसटी अंतर्गत करुन त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कर घटवावेत. त्यामुळे डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतील. डिझेलच्या किंमती देशभरात समान पातळीवर असाव्यात आणि त्या तीन महिन्यांनी एकदा बदलल्या जाव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टोल पध्दत सुधारण्याचीही गरज असून सदोष व अपारदर्शकतेमुळे सध्या वर्षांला सरासरी १,५० हजार कोटी रुपयांचे इंधन वाया जात आहे. त्या कालावधीत टोल संकलन मात्र २० हजार कोटी रुपयांचेच होत आहे. त्यामुळे यात सुधारणेची गरज आहे. याशिवाय थर्ड पार्टी इशुरन्सच्या हफ्त्यामध्ये पारदर्शकता आणण्याची गरज असून या मागण्या शासनाकडे वाहतूकदार संघटनांकडून वारंवार केल्या जात आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसकडून २० जुलैपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये मालवाहतूकदारांबरोबर खासगी बस, टॅक्सीही आहे. तसेच संपाला स्कूल बस संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. संपाच्या पहिल्या दिवशीच मोठय़ा प्रमाणात मालवाहतूक ट्रक, टेम्पोसह खासगी बस, मालवाहू कंटेनर हे रस्त्यावर उभे होते. या संपात देशभरात ९३ लाख ट्रक वाहतूक बंद राहतानाच यामध्ये १६ लाख महाराष्ट्रातील ट्रक, बस सहभागी होणार होते. संपाला मालवाहतूकदारांनी चांगलाच पाठिंबा दिल्याने बहुतांश वाहने उभीच होती. राज्याराज्यातील छोटय़ा-मोठ्या वाहतूक या बंदच होत्या. गोदींमधील वाहतूक ही ठप्पच असल्याचे सांगितले जाते. खासगी प्रवासी बस या धावूच न शकल्याने यातून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मात्र हाल झाले. अनेकांना वाहतुकीसाठी अन्य पर्याय शोधावा लागला. दिवसभरातील उलाढाल न झाल्याने मोठे नुकसान उद्योग क्षेत्राला सहन करावे लागल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. देशभरात हा फटका चार हजार कोटी रुपयांचा असून महाराष्ट्रात तो ६४० कोटी रुपये असल्याचा दावा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी केला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.