Menu

देश
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, एकाचा अपघाती मृत्यू

nobanner

जम्मू – काश्मीरच्या अवंतीपोरा (Awantipora) भागाजवळ गोरीपोरामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आत्मघाती हल्ला (Suicidal Attack) जालाय. हा हल्ला सीआरपीएफ (CRPF) च्या वाहनांना निशाण्यावर घेत आयईडी स्फोटच्या (IED Blast) साहाय्यानं हा हल्ला घडवून आणण्यात आला. हा हल्ला झाला तेव्हा जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे रवाना जात होता. न्यूज एजन्सी राऊटर्सनं (Reuters) दिलेल्या माहितीनुसार, या हल्लात आत्तापर्यंत ४४ जवानांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याचा एक व्हिडिओही जैश ए मोहम्मदकडून जारी करण्यात आलाय. पुलवामाच्या दहशतवादी हल्यातील शहिदांमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांचा समावेश असल्याचं समजतंय. याअगोदर सांगली जिल्ह्यातील जवान राहुल कारंडे शहीद झाल्याची माहिती हाती आलीय.

बुलडाणा जिल्ह्यातील नीतीन राठोड शहीद
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरपांगरा गावचे नितीन शिवाजी राठोड हेदेखील या हल्ल्यात शहीद झालेत. नितीन राठोड यांच्या पश्चात पत्नी वंदना राठोड, मुलगा जीवन, मुलगी जीविका, आई सावित्रीबाई राठोड, वडील शिवाजी राठोड, भाऊ प्रवीण आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

दहशतवादी हल्ल्यात नीतीन राठोड शहीद झाल्याने त्यांच्या लोणार तालुक्यातील चोरपांगरा गावावर शोककळा पसरली आहे. नीतीन राठोड शहीद झाल्याचं समजताच संपूर्ण कुटुंबाला आणि अख्ख्या गावालाच धक्का बसला. स्थानिकांनी राठोड यांच्या घरासमोर गर्दी केलीय.

बुलडाण्याचा दुसरा सुपुत्र संजय राजपूत शहीद
याच पुलवामा आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याला महाराष्ट्राचा दुसरा सुपुत्र संजय राजपूतही बळी पडलेत. कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले संजय राजपूत हे बुलडाणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. संजय राजपूत यांचं कुटुंब हे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर इथल्या लखानी प्लॉट इथं राहतं.

४९ वर्षीय संजय राजपूत शहीद झाल्याचं समजताच मलकापूरवर शोककळा पसरलीय. ८ मे १९७३ रोजी जन्मलेले संजय राजपूत हे बटालिया ११५ मध्ये कार्यरत होते. नागपूरला सीआरपीएफमध्ये भर्ती झालेल्या संजय राजपूत यांना आपली २० वर्षांची सेवा पूर्ण केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या सेवेचे पाच वर्ष वाढवून घेतले होते. संजय राजपूत यांना १३ आणि १० वर्षांची दोन मुलं आहेत.

चार भाऊ आणि एक बहिण अशा भरगच्च कुटुंबात ते मोठे झाले. संजय राजपूत यांच्या एका भावाचा काही महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता संजय यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला कधीही भरून न येणारी उणीव जाणवतेय.

राहुल कारंडे यांचा अपघाती मृत्यू
गुरुवारी एकाच दिवशी महाराष्ट्रानं आपल्या तीन सुपुत्रांना गमावलंय. गुरुवारी सांगली जिल्ह्यातील जवान राहुल कारंडे यांचा एका अपघातात मृत्यू झाल्याचं समजतंय. राहुल कारंडे कवठेमडंकाळ इथल्या विठुरायाची वाडी या गावचे रहिवासी होते.