Menu

देश
दहाही फलंदाज त्रिफळाचीत, ४ धावांमध्ये संघ माघारी..जाणून घ्या कोणत्या सामन्यात घडला प्रकार

nobanner

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने आपण सर्वांनी अनुभवले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात तब्बल २० सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगले होते. मात्र केरळमधील एका स्थानिक सामन्यामध्ये संघ ४ धावांमध्ये माघारी परतला आहे.

केरळच्या मालापुरम जिल्ह्यात वायनाड आणि कासारगौड संघात सामना खेळवण्यात येत होता. पेरिनथमाला मैदानावरील सामन्यात कासारगौड संघ अवघ्या ४ धावांवर माघारी परतला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या संघातला अकरावा खेळाडूही एकही धाव काढू शकला नाही. कासारगौड संघातले दहाही फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परतले.

वायनाडच्या गोलंदाजांनी ४ धावा अतिरिक्त स्वरुपात दिल्यामुळे कासारगौड संघाने खातं उघडलं. विजयासाठी आवश्यक असलेलं ५ धावांचं आव्हान वायनाडच्या संघाने पहिल्याच षटकात पूर्ण केलं. या सामन्याची स्थानिक क्रिकेट वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.